मुंबई लोकल, तसेच राज्यातील अनलॉकवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे भाष्य


मुंबई – राज्यावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पण राज्यातील अनेक ठिकाणी आजही निर्बंध कायम आहेत. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील लोकल कधी सुरू होणार, तसेच राज्यात अनलॉक कधी होणार, अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. दिसालादायक म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे राजेश टोपे म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर म्हणाले, तिसरी लाट येऊ शकते पण ते कधी येईल हे आपल्यावर आहे. आपण जर कोरोनाचे नियम व्यवस्थित पाळले, तर आपल्याला कोरोनाची तिसरी लाट थोपवता येऊ शकेल. तसेच लसीकरण सुद्धा रामबाण उपाय असल्याचे टोपे म्हणाले.

पहिला रुग्ण आढळल्यापासून ICMR ने काही नियम आखून दिले आहेत. त्या नियमानुसारच महाराष्ट्र काम करत आहे. ICMR सेरो सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला प्रोटोकॉल द्यावा. कशाप्रकारे निर्बंधामध्ये सुट देता येईल या संदर्भात सुचना द्याव्या. कारण आताच केंद्राचे पथक येऊन गेले त्यांनी निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवणे, अशा सुचना दिल्या. आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमची वर्तवणुक असते. ICMR ने मार्गदर्शन केल्यास आम्हाला निर्णय घेता येईल.