मंत्रालयाचा पदभार हातात घेतल्यानंतर नारायण राणे अॅक्शन मोडमध्ये; घेतली अधिकाऱ्यांची शाळा


नवी दिल्ली – आता नव्या केंद्रीय एमएसएमई मंत्री रुपात महाराष्ट्राचे दिग्गज नेते नारायण राणे हे कारभार सांभाळणार आहेत. दरम्यान नारायण राणे यांनी असे म्हटले की, मंत्रालय अधिक रोजगार सृजित करण्यासह जीडीपी वृद्धिचा वेग वाढवण्याच्या दिशेने काम करणार असून आज मी पदभार स्वीकार आहे. जीडीपीमध्ये वेग आणण्यासाठी आणि तरुणांसाठी रोजगार सृजन उपायांवर आम्ही खासकरुन लक्ष देणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला जेव्हा नारायण राणे मंत्रालयाचा पदभार सांभाळण्यासाठी दाखल झाले, तेव्हा त्यांनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांची शाळा घेतल्यामुळे.अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाल्याचे दिसून आले.

प्रश्न विचारल्यानंतर मंत्र्यांच्या स्वागतासाठी हातात फुलगुच्छ घेऊन उभे असलेल्या अधिकाऱ्यांनी राणे यांनी विचारलेले प्रश्न ऐकताच आजूबाजूला पाहू लागले. खरंतर नारायण राणे यांनी असा प्रश्न विचारला की, मंत्रालयाचे जीडीपीमध्ये किती योगदान आहे? तसेच गेल्या दोन वर्षात किती रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या? पुढे असा ही प्रश्न विचारला की, तुमच्या हातात कोणीही फाइल घेऊन आले नाही? कोण सांगणार हा डेटा? यावर अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की, काही लोक सुट्टीवर गेले आहेत, तर काहीजण त्यांच्या घरी लग्न असल्यामुळे उपलब्ध नाहीत त्यामुळे ते परतल्यानंतर डेटा उपलब्ध करुन देऊ.

नारायण राणे यांनी हे प्रश्न विचारल्यानंतर ते ऐवढ्यावरच थांबले नाही तर पुढे असे ही म्हटले की, किती कर्मचारी लग्नासाठी गेले आहेत. यामुळे अधिकारी गोंधळले. अधिकाऱ्यांना राणे यांनी संध्याकाळ पर्यंत पूर्ण डेटासह बैठकीत येण्यासाठी म्हटले आहे. ऐवढेच नव्हे अधिकाऱ्यांच्या या वागणुकीमुळे ते नाराज झाले आणि जर काम आणि प्रदर्शन उत्तम नसल्यास सर्वांवर कारवाई तर नक्कीच करणार, असे त्यांनी म्हटले आहे.