तृतीयपंथींयांचे शाप किंवा वरदान मनुष्यावर खरच लागू होतात का ?


आपल्या घरातील शुभकार्या दरम्यान बऱ्याचदा तृतीयपंथींयांना बोलावून त्यांना नाचवले जातात. त्यादरम्यान त्यांचे आशीर्वाद देखील घेतले जातात. त्यामागे शुभकार्यात कोणते अशुभ घडू नये, सर्व चांगले व्हावे, त्या कुटूंबाची भरभराट व्हावी ही श्रद्धा सर्वसामान्यपणे असते. पण आपण एखाद्या तृतीयपंथास पैसे देण्यास नकार दिल्यास ते आपल्याला शाप देतात असे ही आपल्याला अनेकदा पाहायला मिळते. पण त्यांनी दिलेले हे शाप किंवा वरदान मनुष्यास खरच लागू होतात का याबाबत अजून ब-याच शंका-कुशंका आपल्या मनात आहेत. तसे पाहायला गेले तर, अगदी पौराणिक काळापासून तृतीयपंथींयांचे अस्तित्व असल्यामुळे बरीच लोक आजही त्यांना खूप मानतात. पण त्यांनी दिलेले आशीर्वाद किंवा शाप यांचे आपल्या आयुष्यात किती महत्त्व असले पाहिजे, यामागच्या काही गोष्टींचा उलगडा आम्ही तुम्हाला करणार आहोत.

पौराणिक कथेनुसार, प्रभू श्री राम वनवासासाठी जेव्हा अयोध्या सोडून चालले होते, अनेक अयोध्यावासीही तेव्हा त्यांच्या मागे मागे येऊ लागले, तृतीयपंथींयांचा देखील ज्यात समावेश होता. सर्वांना मागे जाण्यास श्री रामांनी सांगितले. त्यावेळी सर्वजण निघून गेले पण तृतीयपंथी निघून गेले नाही. अनेकदा प्रभू रामचंद्रांनी सांगूनही ते तिथून निघून गेले नाही. प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या या निस्सीम भक्तीवर खूश होऊन त्यांना आशीर्वाद दिला की, कोणालाही तृतीयपंथींयांनी दिलेला आशीर्वाद फलित होईल. तेव्हा पासून कोणाचा जन्म, लग्न अथवा नव्या व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर तृतीयपंथींयांना बोलावले जाते. तसेच त्यांचा आशीर्वाद कोणत्याही शुभकार्यात खूप लाभदायक मानला जातो.

त्यामुळे अंधश्रद्धा म्हणून नाही, पण सहसा कोणी दारात आलेल्या तृतीयपंथींयांचा अपमान करु नये. तसेच त्यांना खाली हात न जाऊ देता काही हातावर काही तरी दान करावे. असे म्हटले जाते की, तुम्ही जर कोणत्या बुधवारी तृतीयपंथींयांना काही पैसे दिले तर त्या बदल्यात त्याच्याकडून एखादा रुपया परत घेऊन तुमच्या पर्समध्ये ठेवा. पण हे लक्षात ठेवा की तुम्ही दिलेल्या पैशांमधला हा रुपया असला नाही पाहिजे. जो पर्यंत तो रुपया तुमच्या पर्समध्ये असेल तोपर्यंत तुमच्याकडील पैशात काही कमतरता भासणार नाही.

या जरी भाकडकथा असल्या किंवा लोकांचे विचार असले तरी पैसे कमावण्याच्या उद्देशाने अनेक पुरुषच आजच्या काळात स्त्रिया बनून थोडक्यात तृतीयपंथींयांचा वेश परिधान करुन भीक मागतात. त्यामुळे अनेक जण त्यांना पिटाळून लावतात. त्यामुळे त्यांचा अनादर न करता त्यांना काहीतरी दानधर्म करावा असेच येथे सांगता येईल.

Leave a Comment