नीता अंबानींकडून 5 मिशन लॉन्च, नवी मुंबईत सुरु होणार जिओ इन्स्टिट्यूट


मुंबई – मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी रिलायंसच्या 44 व्या एजीएममध्ये मोठी घोषणा केली आहे. नीता अंबानी यांनी जिओ इंस्टिट्यूटसंदर्भात सांगितले की, याचवर्षी हे इंस्टिट्यूट सुरु होईल आणि नवी मुंबईत या इंस्टिट्यूटची स्थापना केली जात आहे.

एजीएममध्ये नीता अंबानी यांनी म्हटले की, कोरोना काळात आम्ही बालकांच्या संदर्भातील खेळांसंदर्भात काही नव्या गोष्टी सुरु केल्या आहेत. या माध्यमातून आम्ही 2.15 कोटी मुलांपर्यंत पोहोचलो आहोत. नीता अंबानी पुढे म्हणाल्या की, देश आणि समाजाला मजबूत बनवायचे असेल तर महिला आणि मुलींना सशक्त बनवणे गरजेचे आहे. तसेच व्यवसायासोबत समाजाला सशक्त बनवणे आमचे मिशन आहे. यासाठी रिलायंस फाऊडेशनने पाच महत्वाचे मिशन लॉन्च केले आहेत.

रिलायंसकडून पाच महत्वाचे मिशन लॉन्च करण्यात आले आहेत. यात पहिले मिशन ऑक्सिजन, दुसरे मिशन कोविड इंफ्रा, तिसरे मिशन अन्न सेवा, चौथे मिशन एम्प्लाई केअर आणि पाचवे मिशन व्हॅक्सिन सुरक्षा हे असल्याचे त्यांनी सांगितले.

नीता अंबानी म्हणाल्या की, 2 आठवड्यांमध्ये प्रत्येक दिवशी आरआयएलने 1100 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन केले आहे. देशात मेडिकल ऑक्सीजनचे 11 टक्के उत्पादन आरआयएल करत आहे. नीता अंबानी म्हणाल्या की, आरआयएलने रोज 15,000 कोरोना टेस्टिंग क्षमता तयार केली आहे. रिलायंस परिवार आम्हाला ताकत देतो, हा विशाल परिवारच आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे.

नीता अंबानी आपल्या भाषणात म्हणाल्या की, रिलायंसने लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. जिओ हेल्थ अॅपच्या मदतीने आमचा मार्ग सुकर केला आहे. त्यांनी सांगितले की, कोरोनाकाळात आजपर्यंत आम्ही 7.5 कोटी गरजवंतांना जेवण दिले आहे.