महिनाअखेर कधीही होऊ शकतो मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार


नवी दिल्ली : आता निवडणूक आयोगापर्यंत लोक जनशक्ती पक्षाची अतंर्गत लढाई पोहोचली असून आपापल्या पद्धतीने पक्षावर चिराग पासवान आणि पशुपती पारस हे आपला अधिकार गाजवत आहेत. दरम्यान, पशुपती पारस पाटण्याहून दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

पशुपती पारस यांनी दिल्लीत पोहोचल्यानंतर एबीपी न्यूजशी बोलताना म्हटले की, आता पक्षाचे चिराग पासवान अध्यक्ष राहिलेले नाहीत. म्हणूनच त्यांना बैठक बोलावण्याचा अधिकार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार लोक जनशक्ती पक्षाच्या अंतर्गत लढाईला आता आगामी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराशी जोडले जात आहे. सध्या मोदी मंत्रिमंडळात प्रवेश होण्याच्या शक्यतेवर पशुपती पारस म्हणतात की, त्याचे पंतप्रधानांना विशेषाधिकार आहेत.

प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी एका आठवड्यापूर्वी एकामागून एक बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला.

सूत्रांच्या माहितीनुसार पुढील मंत्रिमंडळात बिहारमधील दोन पक्ष जेडीयू आणि एलजेपीला स्थान मिळू शकते. असे मानले जाते की मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी पशुपती आणि चिराग पासवान यांच्यातील अंतर वाढले आणि पक्षात फुटण्याची परिस्थिती ओढावली. एवढेच नाही तर बिहारमधील मागील विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने नितीशकुमार आणि चिराग पासवान यांच्यात तणाव वाढला होता, त्यालाही एक कारणही मानले जात आहे.

लोक जनशक्ती पक्षाच्या अंतर्गत लढाईदरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची हालचाल तीव्र झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मोदी सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण केली आहे. कधीही मंत्रिमंडळ विस्तार केला जाऊ शकतो. सरकारी सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, पहिला विस्तार सर्वसमावेशक होण्याची शक्यता आहे.

संघटनाच्या जबाबदाऱ्या सध्याच्या मंत्रिमंडळातील बऱ्याच जणांना दिल्या जाऊ शकतात. मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश असू शकतो. मंत्रिमंडळात प्रादेशिक पक्षांना समाविष्ट करण्याचीही तयारी आहे. या महिन्याच्या शेवटी कधीही मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.