केंद्र सरकारची कबुली; कोरोना प्रतिबंधक लसीमुळे देशात पहिल्या मृत्यूची नोंद


नवी दिल्ली – कोरोना लस दिल्यानंतर देशात झालेल्या पहिल्या मृत्यूची खात्री पटली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे एका ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही बाब केंद्र सरकारने गठित केलेल्या पॅनेलच्या अहवालात समोर आली आहे. लसीकरणानंतर गंभीर आजार किंवा मृत्यू झाल्यास याला वैज्ञानिक भाषेत अ‍ॅडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्यूनिझेशन (AEFI) म्हणतात. AEFI साठी केंद्र सरकारने समिती गठीत केली आहे.

या समितीने ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू लस घेतल्यानंतर ३१ मृत्यूंचे आकलन केल्यानंतर, लस घेतल्यानंतर अ‍ॅनाफिलेक्सिसमुळे झाल्याची पुष्टी केली. ही एक प्रकारची अ‍ॅलर्जी आहे. वृद्धाला लसीचा पहिला डोस ८ मार्च २०२१ रोजी मिळाला होता आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.लसीमुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी AEFI समितीचे चेअरमन डॉ. एनके अरोरा यांनी केली आहे. परंतु, यासंदर्भात त्यांनी यापुढे काही बोलण्यास नकार दिला. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

कोरोना लसीमुळे आणखी तीनजणांचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. परंतु अद्याप याची पुष्टी होणे बाकी आहे. सरकारी समितीच्या अहवालात असे म्हटले आहे की, आता लसीशी संबंधित ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्याची अपेक्षा आधीच होती, जी सध्याच्या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे लसीकरणास जबाबदार ठरू शकते. या प्रतिक्रिया अ‍ॅलर्जीशी किंवा अ‍ॅनाफिलेक्सिससारखे असू शकतात.

अहवालात सांगितले गेले की, अ‍ॅनाफिलेक्सिसचे आणखी दोन प्रकरणे समोर आले होते. या दोन लोकांना १६ जानेवारी आणि १९ जानेवारी रोजी लस दिली होती. यामध्ये एक २२ वर्षांचा आणि एक २१ वर्षांचा होता. या दोघांना वेगवेगळी लस देण्यात आली होती. रुग्णालयात भरती केल्यानंतर दोघे बरे झाले. डॉ. एनके अरोरा सांगतात, हजार जणांमध्ये एकाला ही अ‍ॅलर्जी होते. लसीकरणानंतर अ‍ॅनाफिलेक्सिसची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार आवश्यक आहेत. ३० हजार ते ५० हजारांपैकी एकाला अ‍ॅनाफिलेक्सिस किंवा तीव्र अ‍ॅलर्जीची लक्षणे दिसतात, हे लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचार घ्यावे.