सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास थांबवण्याच्या विचारात पोलीस


मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आज (14 जून) एक वर्ष पूर्ण होत असतानाच देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा म्हणून ओळख असणाऱ्या सीबीआयच्या हाती सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या तपासात काहीच लागलेले नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आजच्याच दिवशी 14 जून 2020 रोजी, एका वर्षापूर्वी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळ्याला फास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी एजीआर रजिस्टर करत तपास सुरु केला होता. या दरम्यान बिहार पोलिसांनी सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीऱ्याच्या आधारे त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह तिचे कुटुंब आणि मॅनेजर श्रुती मोदीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

बिहार सरकारच्या परवानगीनंतर काही दिवसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपण्यात आला. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जरी एफआयआर सीबीआयकडे असेल आणि तपास सुरु असेल, पण आमच्याकडे अद्यापही एडीआरचा तपास सुरु आहे. ज्याला आम्ही अद्याप बंद केला नाही. कारण या प्रकरणी आम्ही प्रत्येक अँगलने चौकशी करत आहोत. पण अद्याप आम्हाला काहीच संशयास्पद आढळलेले नाही, ज्याच्या आधारे आम्ही एडीआरला एफआयआरमध्ये कन्वर्ट करता येईल.

मुंबई पोलिसांनी हे देखील सांगितले की, हे प्रकरण जेव्हा बिहारहून सीबीआयकडे गेले, त्यावेळी सीबीआयने आपल्या तपासासाठी वांद्रे पोलीस ठाण्यातील सर्व ओरिजनल दस्तावेज आपल्याकडे घेतले होते. सीबीआयचा तपास आतापर्यंत पूर्ण झालेला नसल्यामुळेच सीबीआयने आतापर्यंत ती ओरिजनल कागदपत्र मुंबई पोलिसांना परत केलेली नाहीत. मुंबई पोलीस वाट पाहत आहेत की, सीबीआय त्यांना ती कागदपत्र पूर्ण करेल आणि एकदा कागदपत्र हातात आले की, पोलीस अधिकृतपणे एडीआर अधिकृतरित्या बंद करु शकतील.