काल दिवसभरात 2.59 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 4209 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली : कालच्या तुलनेत देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. देशात काल एकाच दिवसात 2,59,551 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 4209 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर काल दिवसभऱात 3,57,295 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. बुधवारच्या तुलनेत देशातील सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख एक हजार 953 ने कमी झाली आहे. देशात बुधवारी 2.76 लाख नव्या रुग्णांची भर पडली होती, तर 3874 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

त्याचबरोबर देशात आतापर्यंत 19 कोटी 18 लाख 79 हजार 503 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर काल एकाच दिवशी देशात 14 लाख 82 हजार 754 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत 32 कोटीहून जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. आज 47,371 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29,911 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 50,26,308 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.4 टक्के एवढे झाले आहे.

काल दिवसभरात राज्यात 738 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.55 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,21,54,275 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,97,448 (17.9 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 29,35,409 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 21,648 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 38,32,253 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत काल 1425 नवीन कोरोनाबाधितांचे निदान झाले आहे, तर 1460 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 59 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.