भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला आणखी एका बँकेचा परवाना


नवी दिल्लीः भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (अमरावती) परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला आहे. पुरेसे भांडवल या बँकेकडे उपलब्ध नाही. तसेच ही बँक सध्याच्या ठेवीदाराची परतफेड करण्यास सक्षम नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने म्हटले आहे की, बँकेने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार ते 98 टक्के ठेवीदारांना पूर्णतः परतावा देण्यास सक्षम आहेत. परतावा डिपॉझिट इन्श्यॉरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन करेल.

लिक्विडेशन झाल्यास प्रत्येक ठेवीदारास ठेवी विम्याच्या दाव्यांतर्गत 5-5 लाखांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. हे DICGC कायदा 1961 च्या तरतुदीखाली आहे. 23 एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या बँकिंग व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे. परवाना रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, कारण बँकेकडे भांडवल नसल्याने आणि बँकिंग नियमन कायदा 1949 मधील अनेक तरतुदी पूर्ण करू शकत नसल्याचेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

आरबीआयने परवाना रद्द करण्यापूर्वी दुसऱ्या बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. फसवणुकीचा बळी ठरलेल्या या बँकेचे ‘Sambandh Finserve Pvt Ltd’, असे नाव आहे. फसवणुकीनंतर या बँकेची निव्वळ मालमत्ता आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी होऊ लागली आणि अलिकडच्या काही महिन्यांत बँकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खराब होत गेली. मनी कंट्रोलने आपल्या एका अहवालात या प्रकरणाची माहिती देत दोन लोकांचा हवाला दिला आहे.

वास्तविक Sambandh Finserve Pvt Ltdचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक किडो यांना या घोटाळ्याचा मुख्य आरोपी मानले जाते. दीपक किडो यांनाही चेन्नई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. हे Sambandh Finserve Pvt Ltd यांनी एनबीएफसी-एमएफआय म्हणून नोंदवले आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांनुसार, बिगर-बँकिंग वित्तीय संस्थेला टीयर -1 आणि टीयर -2 च्या रूपात नेहमी भांडवल राखणे बंधनकारक आहे. ही जोखीम त्यांच्या धोक्याच्या 15 टक्के असावी.