दोन दिवसात पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करुन घ्या, अन्यथा बंद होणार तुमचे पॅन कार्ड


नवी दिल्ली : आता केवळ दोनच दिवस पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी उरले असून पॅन कार्डला आधार कार्ड 31 मार्चपर्यंत लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आयकर कायद्याच्या नियमानुसार, जर या काळात आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केले नाही तर तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना पॅन कार्ड त्यांच्या आधारला लिंक करावे लागणार आहे. तसे केले नाही तर त्या कर्मचाऱ्यांना 20 टक्के अतिरिक्त कर द्यावा लागणार आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. सरकारने या आधीही पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली होती. लोकसभेत या संबंधी अर्थ विधेयक, 2021 गेल्या आठवड्यात पारित करण्यात आले आहे. त्यानुसार आता नागरिकांनी आपल्या पॅन कार्डला आधार लिंक केले नाही तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पॅन कार्डला आधारशी लिंक करु शकता

  • आयकर ई-फायलिंग वेवसाइट किंवा 567678 किंवा 56161 या नंबरवर sms करून.
  • मोबाईलच्या माध्यमातून जर पॅनशी आधार लिंक करायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाइप करा आणि 567678 किंवा 561561 या नंबरवर sms पाठवा.

ऑनलाइन पद्धतीने देखील करता येईल लिंक

  • आयकर विभागाचे संकेतस्थळ https://incometaxindiaefiling.gov.in ला भेट द्या.
  • त्यामध्ये पॅनला आधार लिंक करण्याचा पर्याय समोर येईल. तो क्लिक केल्यानंतर एक फॉर्म समोर येईल.
  • त्यावर तुमचा पॅन क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक टाकावा. तसेच इतर व्यक्तिगत माहिती भरावी लागेल.
  • त्यावेळी तुम्हाला एक ओटीटी क्रमांक येईल. तो ओटीटी क्रमांक भरल्यानंतर लिंक आधार असा पर्याय समोर दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक होईल.

दरम्यान केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने असे स्पष्ट केले नागरिकांना त्यांना दिलेल्या वेळेच्या आत त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करावे. असे केले नाही तर संबंधित पॅन कार्ड बंद होईल. त्यामुळे अनेक आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. तसेच बँक खाते उघडणे, बँकांचे व्यवहार, सरकारी पेन्शन, एलपीजी सब्सिडी, स्कॉलरशीप अशी अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागेल.