नवी दिल्ली – मागील २४ तासात भारतात ५३ हजार ४७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच महिन्यात ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. त्याचबरोबर भारतातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ वर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
गुरुवारी भारतात २३ ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या २१ तासात भारतात ५३ हजार ४७६ नवे रुग्ण आढळले असून २५१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भारतात सध्याच्या घडीला रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ रुग्णांवर पोहोचली असून १ कोटी १२ लाख ३१ हजार ६५० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ३ लाख ९५ हजार १९२ इतकी असून मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ६९२ एवढी आहे. देशभरात आतापर्यंत ५ कोटी ३१ लाख ४५ हजार ७०९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.