मोदी सरकारचा मोठा निर्णय; 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचे एक एप्रिलपासून लसीकरण


नवी दिल्ली : 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना एक एप्रिलपासून कोरोनाची लस देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच देशात लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कोरोना लसीची कोणताही तुतवडा भासणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यासंदर्भात माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना 1 एप्रिलपासून कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही आवाहन करतो की, सर्वांनी लगेच नोंदणी करावी आणि लसीकरण करुन घ्यावे.

दरम्यान, देशात कोरोनाने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे. कोरोनाची दुसरी लाट देशात आल्याचे बोलंले जात आहे. अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत आहे. त्यासाठी लस हा सर्वात उत्तम मार्ग असून सर्वांचं लसीकरण करणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.