अखेर मुख्यमंत्र्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर सोडले मौन


मुंबई – राज्यातील वातावरण पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरून चांगलेच गरम झाल्याचे दिसत आहे. हा मुद्दा भाजपने आक्रमक भूमिका घेत उचलून धरला असून, थेट शिवसेना मंत्र्यावरच आरोप केला आहे. आज (शनिवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. व्यवस्थित चौकशी या प्रकरणी केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल. त्यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल, त्यांच्यावर कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले आहे.

तसेच, आपल्या गेले काही दिवस काही महिने काही वेळेला असे लक्षात आलेले आहे. आय़ुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे. तर यापुढे असाही प्रयत्न होता कामा नये व याचबरोबर सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही सत्य असेल ते पूर्ण चौकशीतून जनतेसमोर येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

राज्यातील राजकारण पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाभोवती फेर धरताना दिसत आहे. या प्रकरणी एका मंत्र्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी रात्री भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले होते. मात्र, पण हे नाव घेणे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही टाळल्यामुळे भाजपमध्येच एकवाक्यता नाही का?, असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.