ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी एकनाथ खडसेंनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली


मुंबई : 17 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार असून खडसेंविरोधात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, ही याचिका या मागणीसाठी दाखल करण्यात आली होती. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली. पण इतर कामात खडसे यांचे वकील व्यस्त असल्यामुळे न्यायालयाकडे त्यांनी वेळ मागितला आहे. त्यामुळे खडसेंनी दाखल केलेल्या या याचिकेवर पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला होणार आहे.

ही सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होईपर्यंत खडसे यांना सरंक्षण मिळणार आहे. यावर सुनावणी होईपर्यंत ईडीला त्यांच्याविरोधात काहीही कारवाई करता येणार नाही. ईडीने एकनाथ खडसे यांच्या विरोधात ECIR दाखल केला आहे. पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे खडसे यांच्या विरोधातगुन्हा दाखल झाला होता. खडसेंनी मंत्री असताना कोट्यवधी रुपयांची जमीन लाटल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता. याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पुणे एसीबीने केला होता. यानंतर तपास झाल्यावर याबाबत गुन्हा घडला असल्याचे आढळून येत नसल्याने एसीबीने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.

आता ईडीने याच प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ईडीने खडसे यांची याप्रकरणी चौकशीही केली. पण त्यांना चौकशीसाठी पुन्हा यावे लागेल, असे सांगण्यात आल्यामुळे आपल्याला ईडी अटक करू शकते, असे खडसे यांना वाटत असल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालायत आपल्या विरोधात ईडीने दाखल केलेला ECIR रद्द करावा या मागणीसाठी याचिका केली आहे. आज त्यावर सुनावणी झाली. ईडीतर्फे अडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला.