शेतकऱ्यांवर टीका करणे कंगनाला पडले महागात; सहा कंपन्यांनी रद्दल केले करार


जेथे देशभरात ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. त्याचवेळी दुसरीकडे या उत्साहाला गालबोट लावणारी घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण मिळाले. शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष होऊन या रॅलीला हिंसक वळण लागले. लाल किल्ल्यावर यावेळी निशान साहिब हा झेंडा फडकावल्यानंतर हा विषय देशभरात चर्चेचा विषय होता. सरकारचे समर्थन करताना यावेळी अभिनेत्री कंगना राणावतने देखील यावर नाराजी व्यक्त केली.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान मोठा हिंसाचार झाला. कंगनाने या प्रकरणावर एक व्हिडीओ शेअर करत शेतकऱ्यांवर टीका केली होती. स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे दहशतवादी असून त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना तुरुंगात टाका, असे या व्हिडीओमध्ये तिने म्हटलं होते. सोशल मीडियावर कंगनाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आणि टीकास्त्र डागले. त्यामध्येच आता सहा दिग्गज कंपन्यांनी तिच्यासोबतचे करार रद्द केले आहेत.

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रली आणि निशान साहिब यांच्या झेंडा फडकावल्यावर कॉलमनिस्ट आनंद रंगनाथन यांनी भाष्य केले होते. जेवढे सोप्प अवैध झेंडे फडकावणे वाटते तेवढे ते नाही. ते जागा काबीज करण्याप्रमाणे आहे. प्रबल मानसिकता यामागे जोडली गेलेली आहे. हे चांगले संकेत नाहीत. मी कधी विचार केला नव्हता की, मला असा दिवस पाहावा लागेल. त्यांनी या ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे की, या गोष्टीशी तुम्ही सहमत आहात का?

दरम्यान शेतकऱ्यांना तुम्ही दहशतवादी म्हटल्यामुळे आम्ही आता तुम्हाला बँण्ड अॅम्बेसेडर (सदिच्छादूत) करु शकत नाही. पण, आता मी त्यांना सांगू इच्छित आहे की, आज झालेल्या हिंसेला जे पाठिंबा देत आहेत, ते सुद्धा दहशतवादी असल्याचे ट्विट कंगनाने केले आहे.