रिपब्लिक टीव्हीवरील सर्व गुन्हे मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी जामिनावर सुटलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना दणका देत सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीवरील सर्व गुन्हे मागे घेण्यास नकार दिला आहे.

रिपब्लिक टीव्हीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून अर्णब गोस्वामी यांनी केली होती. त्याचबरोबर सीबीआयकडून या प्रकरणी चौकशी करावी, अशीही मागणीही गोस्वामी यांनी केली होती. न्यायमूर्ती जस्टीस चंद्रचुड यांच्यासमोर आज या याचिकेवर सुनावणी झाली. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे देण्याबद्दल स्पष्ट नकार देत ही याचिकाही फेटाळून लावली आहे. तसंच रिपब्लिक टीव्हीवरील गुन्हे रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

सर्व एफआयआर रद्द करावे आणि महाराष्ट्र पोलिसांकडून संपादक आणि इतर कर्मचाऱ्यांना अटक होऊ नये, अशी मागणी गोस्वामी यांनी या याचिकेमध्ये केली होती. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी अनैसर्गिक असल्याचे सांगून सुनावणी करण्यास नकार दिला.