किरीट सोमय्यांनी खोटे नाटे आरोप करणे बंद करावे, अन्यथा….; संजय राऊत


मुंबई – खोटे-नाटे आरोप करणे किरीट सोमय्या यांनी बंद करावे. तसेच त्यांनी जुनी थडगी उकरुन काढून नयेत, कारण थडगी आम्हाला देखील उकरतात येतात. पण ती आम्ही उकरली तर तुमच्या पापांचेच सांगाडे त्यात जास्त सापडतील, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. भाजपमध्येच सोमय्या यांना गांभीर्याने घेतले जात नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ठाकरे कुटुंबियांवर सोमय्यां यांनी केलेल्या आरोपांबाबत आम्ही काही बोलावे असे कोणतेही महान कार्य त्यांनी केलेले नाही. ते जे काही करत आहेत किंवा करतील त्याकडे त्यांचा पक्षही गांभीर्याने पाहत नसल्यामुळे अशा विधानांमुळे आपल्याच पक्षावरील लोकांचा विश्वास उडतो याचे त्यांनी भान ठेवावे आणि त्यांनी हे खोटे नाटे आरोप करणे बंद करावे, जुनी थडगी उकरायची म्हटले तर आम्हालाही उकरता येतात. आम्ही ती उकरली तर त्यात तुमच्याच पापांचे सांगाडे जास्त सापडतील.

विरोधकांनी वर्षभरात महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी अनेक ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला पण सरकारला थोडेही खरचटले नाही. त्यांनी असे अघोरी प्रयत्न केल्यामुळे ही भाषा त्यांनी बंद केली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सहकार्याची भावना ठेवावी.