मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांनी १ जानेवारीपासून या बदलासाठी तयार राहावे


मुंबई : पेटीएम, गुगल पे, फोन पे, जिओ पे, अॅमेझॉन पे या सारख्या मोबाईल वॉलेटचा वापर करत असाल, तर तुम्हाला १ जानेवारी २०२१ पासून होणाऱ्या काही बदलांसाठी तयारी ठेवावी लागणार आहे. थर्डपार्टी अॅपच्या मुसक्या १ जानेवारी २०२१ पासून आवळल्या जाणार आहेत. दरम्यान थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्स (TPAP) वर ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियाने (National Payments Corporation of India) घेतला आहे.

भविष्यात थर्ड पार्टीची मोनोपली थोपवण्यासाठी आणि त्याच्या साईझनुसार मिळणारे विशेष फायदे थांबवण्यासाठी NPCIने हा निर्णय घेतला. NPCIच्या या निर्णयानंतर UPI ट्रान्झॅक्शनमध्ये एकाच पेमेंट अॅपची एकाधिकारशाही संपणार आहे. या संदर्भातील माहिती देताना NPCI ने सांगितले की, २ अब्ज यूपीआय ट्रान्झॅक्शन प्रत्येक महिन्याला होत आहेत. प्रत्येक पेमेंट गेटवे आणि बँका या सुविधेचा वापर करीत आहे. सामान्य लोकांना यात मोठा फायदा होत आहे. UPI ट्रॉन्झॅक्शनमध्ये अधिक वेग येण्याची शक्यता आहे. यासाठी NPCI थर्ड पार्टी अॅप ट्रान्झॅक्शनवर लगाम लावण्याचा विचार करीत आहे. १ जानेवारीनंतर अॅप आपल्या टोटल वॉल्यूमच्या जास्तच जास्त ३० टक्केच ट्रान्झॅक्शन करू शकतील.

तसेच ही नवीन व्यवस्था १ जानेवारी २०२१ पासून चेक देऊन होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. पण आता रक्कम जर ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर चेक पॉझिटिव्ह पे चेकनेच क्लिअर केली जाईल. चेक देताना ग्राहकच चेक ज्याला दिला जाणार आहे त्याची माहिती देणार आहे. चेक देणारा आणि चेक ज्याला हवा आहे, अशा दोन्ही जणांची माहिती योग्य ठरल्यानंतरच बँक चेक क्लिअर करणार आहे.

ग्राहक एसएमएस, एटीएम मोबाइल अॅप द्वारा चेक लिहिल्याची माहिती देऊ शकतील. ५० हजारावरील रकमेवर बँकांना ही सुविधा द्यावी लागणार आहे. भारतीय रिझर्व बँकेने बँकिंग व्यवहारात होणारी फसवणूक थांबवण्यासाठी Positive pay cheque सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार ५० हजाराच्या वरील चेकवर दोन वेळेस खात्री केली जाणार आहे.