मुंबई – अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अर्णब गोस्वामी अटक केल्यानंतर रायगड पोलिसांनी अलिबाग कोर्टात हजर केले, कोर्टाने त्यावेळी पोलीस कोठडीची मागणी फेटाळत अर्णब गोस्वामींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
स्व. अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत न्हवतं म्हणून अलिबाग मध्ये माहिती काढल्यानंतर असं कळलं की त्यांची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली ते करणं पैसे होऊ शकत नाही, काही लोकांचं म्हणणं आहे ती आत्महत्या नाही. सत्य बाहेर पडेलंच.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 5, 2020
पण आता माजी खासदार निलेश राणे यांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. निलेश राणे म्हणाले की, इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांनी आईसह आत्महत्या केली असेल हे पटत नाही, तर त्यामागे पैशाचे कारण असू शकत नाही. ४-६ कोटींसाठी आईसह आत्महत्या का केली असावी? हा प्रश्न पडतो, त्यांच्या कुटुंबियांच्या माहितीनुसार अन्वय नाईक यांची संपत्ती ३०० कोटींपर्यंत होती, तेथील काही लोकांशी मी चर्चा केली, त्यांनीही ही शंका उपस्थित केली. ३०० कोटींची मालमत्ता असलेला मालक आईसोबत का आत्महत्या करतो असा प्रश्न पडतो, चौकशीतून सत्य बाहेर येईल, असे ते म्हणाले.
खुनशी राजकारणाची दुसरी बाजू पण तितकीच भयानक असते हे आताच्या सत्ताधाऱ्यांनी विसरू नये. कसलीही परवानगी नसताना एका सीनियर पत्रकारावर जी कारवाई करण्यात आली ती द्वेषातून होती, कायद्याला धरून न्हवती हे स्पष्ट झालं. pic.twitter.com/xKEr37Clhq
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 5, 2020
तसेच मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणात ७० दिवसांत राज्य सरकारच्या दबावाखाली पुरावे दडपण्याचा प्रयत्न केल्याचे मी म्हटले होते, मी लीड देऊ शकतो, तपास करण्याचे काम पोलिसांचे आहे. दिशा सालियान-सुशांत प्रकरणात जे बोललो त्यावर मी आजही ठाम आहे, पुरावे नष्ट करण्याचे काम त्या ७० दिवसांत झाले ते समोर आणावे, सत्य जनतेसमोर येईल, असेही निलेश राणेंनी सांगितले.
मराठी माणूस कोरोना आजारा मूळे बिल भरू शकला नाही म्हणून किती मराठी माणसांना जीव गमवावे लागले? लॉकडाऊन मध्ये लाखो मराठी तरुण बेरोजगार झाले, मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८/१९ % झाली, पण नेहमीप्रमाणे सोईचा अलिबागचा मराठी माणूस शिवसेनेला दिसतो पण बहुसंख्य मराठी माणसं दिसत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 5, 2020
त्याचबरोबर कोरोना आजारामुळे मराठी माणूस बिल भरू शकला नाही म्हणून किती मराठी माणसांना जीव गमवावा लागला? लाखो मराठी तरुण लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाले, मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८/१९ टक्के झाली, पण नेहमीप्रमाणे सोयीचा अलिबागचा मराठी माणूस शिवसेनेला दिसतो, पण बहुसंख्य मराठी माणसे दिसत नसल्याचा टोलाही निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला.