अन्वय नाईक यांच्या पत्नीचा अर्णब गोस्वामींवर गंभीर आरोप


मुंबई – अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी फक्त अर्णब गोस्वामीमुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. ते पैसे जर मिळाले असते, तर आज माझा नवरा जिवंत असता. अर्णब गोस्वामी हा व्हायरस असल्याचे म्हणत अर्णब गोस्वामी यांच्याकडून मानसिक देण्यात आल्याचा आरोप केला आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

माझ्या नवऱ्याने सुसाईड नोटमध्ये तीन लोकांची नावे लिहिलेली होती. त्यांचा एआरजी आउट लायर शेवटचा प्रोजेक्ट होता. पण, त्यांना पैसे फक्त अर्णब गोस्वामीमुळे मिळाले नाहीत. ते पैसे जर मिळाले असती, तर आज माझा नवरा जिवंत असता. अर्णब गोस्वामी हा व्हायरस असून अर्णब गोस्वामीसारख्या माणसांची ही मानसिकता आहे. जे कामे करून घेतात आणि पैसे देत नाहीत. माझ्या मते त्याला कोणत्याही नागरिकाने न्याय देऊ नये. सुशांत सिंह राजपूत आम्ही नसल्याची टीका देखील अक्षता नाईक यांनी केली.

माझ्या वडिलांना अर्णब गोस्वामी हे वारंवार धमक्या देत होते. पैसै तुला मिळणारच नाही. जे मिळालेत ते पण मी कसे वसूल करतो, हे मी बघून घेईन. त्यावेळी आमची यावरून चर्चाही झाली होती की, पोलिसांत तक्रार करू. पण त्याने मुलीचे करिअरही उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती. त्याने सातत्याने आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला. अर्णब गोस्वामी यांनी पैसे न देण्यास आमच्या इतर ग्राहकांनाही सांगितल्यामुळे त्यांच्याकडे पर्यायच उरला नसल्याची माहिती नाईक यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

त्यांनी हे सूडबुद्धीनं केले. स्टुडिओच्या कामाचे बजेट त्यांनी रडून रडून कमी केले. पण, तेही पैसे दिले नाहीत. स्टुडिओवर ८३ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. यापैकी काहीही पैसे देण्यात आले नाही. त्यांचे हे शेवटचे प्रॉजेक्ट होते. त्याचबरोबर दुसरी कामे घेण्यासाठी पैसे नसल्याचा आरोप नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.