मराठा आरक्षणासाठी मी जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरत आहे – छत्रपती संभाजीराजे


कोल्हापूर – खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मी माझा जीव मराठा समाजासाठी धोक्यात घालून फिरत आहे. सरकारला काय सांगायचे? मी बोलून आता थकलो आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने त्वरित पावले उचलावीत एवढीच माझी विनंती आहे, मी आता थकून गेलो असल्याची प्रतिक्रिया दिली. किती वेळा मी बोलायचे. माझा जीव धोक्यात घालून मी सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी होतो. आता मी बोलून बोलून थकलो आहे. गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता मी फिरत आहे. माझा जीव धोक्यात घालून मी मराठा समाजासाठी करत असल्याचे संभाजीराजे म्हणाले. त्यांनी आपली प्रतिक्रिया मराठा आरक्षणाबाबत टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादात व्यक्त केली.

अजूनही मराठा आरक्षणाबाबत वेळ गेलेली नाही, याबाबत सरकारने ताबडतोब पावले उचलावीत. माझी सरकारल एवढीच विनंती आहे. मी थकलो आहे आणि थकून गेल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. मी अनेक दिवसांपासून फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित व्हावे, असे सांगत आहे. माझे अशोक चव्हाण यांच्याशीदेखील दोन दिवसांपूर्वी बोलणे झाले होते. मी त्यांना त्यावेळी उपसमितीची बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. सध्या तीदेखील झालेली दिसत नाही. याचेच आपल्याला आश्चर्यही वाटत असल्याचे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

सरकारी वकील कुठे आहेत असा सवाल सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून करण्यात येतो. ते त्यावेळी उपस्थित नसणे हे दुर्देवी आहे. अशा पद्धतीने मराठा समाजाला गृहित धरायला लागले आहेत का ? सरकारी वकिलांवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. त्याबद्दल कोणतेही दुमत नाही. आपली बाजू मांडणे महत्त्वाचे असल्याचे संभाजीराजे म्हणाले. मराठा आरक्षण हा विषय गांभीर्यानं घ्यावा, त्यातील बारकावे समजून घ्यावे ही यापूर्वीपासून सरकारला सांगत आलो आहे. काही तांत्रिक घोळ झाल्याचे माझ्या कानावर आले आहे. पण कोणी पुढील सुनावणीला उपस्थित न राहिल्यास चुकीचा संदेश जाईल. जी कोणतीही चूक झाली असेल, ती ताबडतोब दुरूस्त करण्यात यावी असेही त्यांनी म्हटले आहे.