धक्कादायक आकडेवारी; उत्तर प्रदेशपेक्षा जास्त महाराष्ट्रात बेरोजगारी


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा प्रकोप रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यानंतर आता अनलॉकदरम्यान परिस्थिती पुन्हा पुर्ववत होत असतानाचे चित्र दिसत आहे. पण सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकनॉमीने (सीएमआयई) जारी केलेल्या आकडेवारीमधून देशातील बेरोजगारांच्या संख्येत कमाची घट झाल्याचे चित्र दिसत आहे.

देशातील बेरोजगारी कमी झाल्याचे दिलासादायक चित्र दिसत असले तरी बेरोजगारीचे देशातील १० राज्यांमधील प्रमाण चिंताजनक असल्याचेही या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. पर्यटन व्यवसायावर आधारित राज्यामध्ये बेरोजगारी वाढल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण हे या आकडेवारीमध्ये उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त असल्याचे दिसत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सीएमआयईच्या अहवालासंदर्भातील वृत्त दिले आहे.

हरयाणामधील १९.१७ टक्के लोक बेरोजगार असून त्यानंतर १५.३० टक्के राजस्थानमधील बेरोजगारीचे प्रमाण तर १२.५ टक्के एवढे प्रमाण दिल्लीत आहेत. निवडणूक असणाऱ्या बिहारमध्ये ११.९ टक्के एवढी बेरोजगारांची संख्या आहे. विशेष म्हणजे बेरोजगारांचे प्रमाण डोंगराळ प्रदेशांमधील राज्यांमध्येही अधिक असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. १२ टक्के हिमाचल प्रदेशमध्ये तर उत्तराखंडमध्ये सर्वाधिक म्हणजेच २२.३ टक्के लोक बेरोजगार आहेत. त्याचबरोबर त्रिपुरामध्ये १७.४ टक्के, गोव्यात १५.४ टक्के आणि जम्मू काश्मीरमध्ये १६.२ टक्के लोक बेरोजगार असल्याचे सीएमआयईच्या सप्टेंबरच्या अहावालामधून समोर आले आहे.

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची सध्या देशभरामध्ये चर्चा आहे. याच बिहारमधील ११.९ टक्के लोक बेरोजगार आहेत. बेरोजगारी हा निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा असल्याचे राज्यातील विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाने सांगत यावरुन राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच आरजेडीने सत्तेत आल्यानंतर १० लाख रोजगार देणार असल्याचेही सांगितले आहे. बेरोजगारीची संख्या पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्येही दुहेरी आकडेवारीच्या आसपास आहे. बंगालमध्ये ९.३ टक्के तर पंजाबमधील ९.६ टक्के लोकांच्या हाती काहीच काम नसल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. ८.२ टक्के एवढे झारखंडमध्ये बेरोजगारीचे प्रमाण आहेत. महाराष्ट्रामध्ये ४.५ टक्के तर उत्तर प्रदेशमध्ये ४.२ टक्के जनता बेरोजगार आहेत. सर्वात कमी म्हणजेच २.१ टक्के ओदिशामधील लोक बेरोजगार आहेत.

पुरेश्या प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये अजूनही मागणी नसल्यामुळे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत नसल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या पूर्वी देशातील अनेक औद्योगिक शहरांमध्ये ज्या पद्धतीने काम केले जात होते तेवढ्या मोठ्या प्रमाणात काम सुरु न झाल्यामुळे इतर अन्य प्रकारेही बेरोजगारी वाढल्याचे सांगितले जात आहे. रोजगाराच्या संधी ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नसणे ही सुद्धा मोठी समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

पर्यटन व्यवसायाला कोरोना लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला असल्यामुळेच उत्तराखंड, हिमाचल, जम्मू-काश्मीरमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वीप्रमाणे पर्यटन व्यवसाय पूर्ण जोमाने सुरु होईपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर बेरोजगारी दिल्ली-एनसीआरसारख्या शहरी भागांमध्ये वाढल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनापूर्व काळाप्रमाणे देशातील वाहतूक, मनोरंजन, रिटेल आणि हॉटेल उद्योग सुरु झालेले नसल्यामुळेच अनलॉकमध्येही अनेक राज्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे.