अमृता फडणवीसांची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका


मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राज्यातील मंदिरे खुली करण्यावरून लेटर वॉर सुरू असून मुख्यमंत्र्यांनी माझ्या हिंदुत्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हणत हिंदुत्वाची आठवण करून देणाऱ्या राज्यपालांना सडेतोड प्रत्युत्तर दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या संघर्षावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या. आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.


अमृता फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधताना, वाह प्रशासन! बार आणि दारूची दुकाने सुरू आहेत. मग मंदिरे डेंजर झोनमध्ये आहेत का? नियमावली लागू करण्यात काही जण असमर्थ ठरतात, त्यांना त्यावेळी प्रमाणपत्राची आवश्यकता असते, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. यावर आता शिवसेना नेमके उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.