नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्ही आणि टाईम्स नाऊ विरोधात बॉलिवूडमधील बड्या कलाकारांसह निर्मात्यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सिनेसृष्टी विरोधात रिपब्लिक टीव्ही आणि टाईम्स नाऊ या वृत्तवाहिन्यांनी बेजबाबदार आणि अपमानास्पद टिप्पण्या करणे किंवा प्रकाशित करण्यास मनाई करावी, अशी मागणी निर्मात्यांनी न्यायालयात केली आहे. त्याचबरोबर आपल्या सदस्यांना त्यांनी विविध विषयांवरील ‘मीडिया ट्रायल’ थांबवण्याचे आवाहन केले आहे. या बड्या कलाकारांमध्ये आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, करण जोहर, अजय देवगन, अनिल कपूर, रोहित शेट्टी यांच्या मालकीच्या प्रॉडक्शन हाऊसचाही यामध्ये समावेश आहे.
उद्योग-संबंधित व्यक्तींना गोपनीयतेच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न चार चित्रपट उद्योग संघटनांनी आणि 34 निर्मात्यांनी दाखल केलेल्या खटल्यात केला गेला. यामध्ये रिपब्लिक टीव्ही, मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि पत्रकार प्रदीप भंडारी, टाइम्स नाऊचे मुख्य संपादक राहुल शिवशंकर आणि समूह संपादक नविका कुमार आणि निनावी प्रतिवादी तसेच सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्म्सना बॉलिवूडविरूद्ध बेजबाबदार आणि अपमानास्पद टिप्पण्या करणे आणि प्रकाशित करण्यास मनाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे
डीएसके लॉ फर्ममार्फत दाखल करण्यात आलेल्या खटल्यात म्हटले आहे की, बॉलिवूडसाठी हे चॅनेल्स “गंदा”, “मैला” “ड्रगी” सारख्या अत्यंत निंदनीय शब्दांचा वापर करत आहेत. यह बॉलीवुड है जहां गंदगी को साफ करने की जरूरत है’, ‘अरब के सभी इत्र बॉलीवुड की बदबू को दूर नहीं कर सकते हैं’, ‘यह देश का सबसे गंदा उद्योग है’, अशी वाक्य हे चॅनेल वापरत आहेत. ‘
याविरोधात ज्या मीडिया हाऊसेसनी दावा दाखल केला आहे त्यामध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडिया (पीजीआय), सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सीआयएनटीए), इंडियन फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर काउन्सिल (आयएफटीपीसी), स्क्रिन राइटर्स असोसिएशन (एसडब्ल्यूए), आमिर खान प्रोडक्शन्स, अॅड-लॅब फिल्म्स यांचा समावेश आहे. अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क, अरबाज खान प्रॉडक्शन, आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शन, बीएसके नेटवर्क अॅण्ड एंटरटेनमेंट, धर्मा प्रॉडक्शन, रॉय कपूर फिल्म्स, सलमान खान फिल्म्स, सोहेल खान प्रोडक्शन्स, टायगर बेबी डिजिटल, विनोद चोप्रा फिल्म्स, विशाल भारद्वाज पिक्चर्स, यश राज फिल्म्स इत्यादींचा समावेश आहे.
बॉलीवुड के गटर में रेंगने वालों अब पता चला कैसा लगता है जब सारे देश के सामने बेइज़्ज़त किया जाता है, निशाना बनाया जाता है,आइसलेट किया जाता है। क्यूँ कहीं छुप या भाग जाने का मन कर रहा है? तुम इतने सारे भेड़िए हो झुंड में, अकेले का मन तो करेगा की मर जाए,नहीं? #BollywoodStrikesBack pic.twitter.com/r4TjvJe7so
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 12, 2020
अभिनेत्री कंगना राणावतने या प्रकणावर ट्विट करत म्हटले की, बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून मी शोषण आणि गुंडगिरीबद्दल तक्रारी करत आहे. एका कलाकाराचा ज्यामुळे मृत्यू झाला. जर बॉलिवूडचे गटार सुशांतच्या मृत्यूमुळे साफ केली जात असेल तर मग एवढा त्रास कशासाठी? असे घडण्याचे सर्व हिशेब माझ्याकडे आहेत. बॉलिवूडच्या गटारात रेंगाळणाऱ्यांना आता कळले आहे की जेव्हा संपूर्ण देशासमोर अनादर केला किंवा वेगळे पाडले तर काय वाटते. आता का लपून किंवा पळून जावेसे वाटते? तुम्ही कळपात बरेच लांडगे आहात, एकट्याला वाटेलच की मरावे, नाही का?