पोट चांगले असेल तर माणूस स्वस्थ असतो. पण बरेच वेळा बाहेरचे पदार्थ खाणे, बाहेरचे पाणी पिणे, जास्त पिक लेली फळे खाणे, खराब झालेले अथवा शिळे अन्न आहारात घेणे, पावसाळ्याचे दिवस असतील तरी पोटात दुखण्याच्या तक्रारी बरेच वेळा ऐकायला येतात. पोटात दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र योग्य कारण कळले तर त्यावर घरच्याघरीही उपचार करून या पोटदुखीतून सुटका करून घेता येते. असेच कांही उपचार-
१) पोटात जंत लहान – मुलांमध्ये पोटात जंत होण्याचे प्रमाण अधिक असते. वावडिंग पाण्यात उकळून ते पाणी १५ दिवस प्यायला दिल्याने जंताचा नाश होतो. दर सहा महिन्यांनी १५ दिवस असे पाणी द्यावे म्हणजे जंत होत नाहीत.
२) पोटातील कृमी – पोटात कृमींचा त्रास लहान मुलांप्रमाणेच बर्याच वेळा मोठयांनाही होत असतो. यावरही वावडिंग घालून उकळलेले पाणी १५ दिवस पिण्याने उपयोग होतो. दुसरा उपाय म्हणज रोठा सुपारी भांडंभर पाण्यात घालून ते पाणी पाव होईपर्यंत उकळुन काढा करावा.हे पाणी प्यायल्याने कृमींचा नाश होतो.
३) लहान मुलांचा कफ – लहान मुलांत सर्दी होण्याचे प्रमाण अधिक असते व यातूनच खोकला अथवा छातीत कफ भरतो. यावर २० ग्रॅम खोबरेल तेल म्हणजे ३ चमचे खोबरेल तेलात ४ -५ थेंब निलगिरी तेल एकत्र करून नाक, छातीला चोळल्याने कफ कमी होतो.
४) रक्त वाढीसाठी – आजकाल बर्याच जणांना रक्तक्षय म्हणजे ऍनिमियाचा त्रास होत असतो. यावर खजूराच्या ४-५ बिया १ महिनाभर खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते.
५) गॅसेस धरणे – बर्याच वेळा वेळी अवेळी जेवण, जड पदार्थांचे सेवन यामुळे पोटात वायू धरतो. शरीराची हालचाल कमी झाल्याने वृध्द व्यक्तीनांही हा त्रास अधिक होतो. त्यावर लिंबू सरबत पिणे उपयुक्त ठरते. तसेच १ भाग मिरे व सहा भाग साखर यांची सुंठवडयासारखी पावडर करून ती थोडी थोडी खावी. हीच पावडर कफ, दम लागणे, ठसका यावरही उपयुक्त ठरते.
Hi, khup chan magiti
Dhanyavad