सणासुदी पूर्वीच केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना देणार १० हजार रुपये अ‍ॅडव्हान्स


नवी दिल्ली – दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले असून आज पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन ‘विशेष फेस्टिवल अॅडव्हान्स स्किम’ची घोषणा केली. केंद्र सरकारने ही स्पेशल एलटीसी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुरु केली आहे.

LTA कॅश व्हाउचर स्कीम आणि स्पेशल फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीम अशा दोन स्कीमची आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे. त्यानुसार सर्व केंद्रीय कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासह राज्य सरकारचेही कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, राज्य सरकारला हे प्रस्ताव मान्य करावे लागतील.

कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा घेण्यासाठी रूपे प्रीपेड कार्ड मिळेल. हे कार्ड रिचार्ज करावे लागले. त्यानंतर यात १० हजार रुपये जमा होती. यासाठी लागणारे बँक शुल्क सरकार भरेल. त्याचबरोबर कर्मचार्‍यांना या योजनेत एलटीएच्या बदल्यात कॅश व्हाउचर मिळणार आहे. पण ३१ मार्च २०२१पूर्वी या व्हाउचरचा वापर करावा लागणार आहे.

तसेच याद्वारे ट्रेन किंवा विमान प्रवास केल्यास करमुक्त असणार आहे. यासाठी कर्मचाऱ्याचे भाडे आणि अन्य खर्च तिप्पट असायला हवा. याचप्रकारे एखाद्या जीएसटी नोंद असलेल्या दुकानदाराकडून सामान डिजिटल पेमेंटने खरेदी घेतल्यास लाभ मिळणार आहे. अॅडव्हान्समध्ये घेतलेली रक्कम कर्मचाऱ्यांना १० महिन्यांमध्ये परत करता करावी लागणार आहे. म्हणजेच महिन्याचा हजार रुपये हप्ता भरावा लागेल. या योजनेमध्ये एकूण ८ हजार कोटींची ग्राहक मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल, असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.