मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आम्ही जर सत्तेत असतो, तर लडाखमध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनला पंधरा मिनिटांत हुसकावुण लावले असते, असे वक्तव्य केले होते. भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी या वक्तव्यावरुन राहुल गांधींना टोला लगावला आहे. चीनचे राहू द्या, महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आहे. येथे एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आधी घराबाहेर काढून दाखवा, असा सल्ला राहुल गांधींना दिला आहे.
राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकले असत. चीन चं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 7, 2020
निलेश राणे राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राहुल गांधी म्हणतात की आमची सत्ता असती तर १५ मिनिटांत चीनला बाहेर फेकले असते. चीनचे राहू द्या, तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे. आधी एक काम करा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा.
राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए के अँटनी रक्षामंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती पण एके अँटनीने हसत उत्तर दिलं, "आमच्या चर्चा सुरू आहे". चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार?? https://t.co/e3MXz2pZZp
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 7, 2020
दरम्यान, निलेश राणेंनी १५ मिनिटांत चीनला बाहेर फेकले असते, असे म्हणणाऱ्या राहुल गांधींचा इतिहास कच्चा असल्याचा टोला लगावला. राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए के अँटनी संरक्षणमंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती. पण “आमची चर्चा सुरू आहे”, असे उत्तर एके अँटनींनी हसत दिले, पण चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार??