दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात अत्याचाराचा आरोप करत अभिनेत्री पायल घोषने तक्रार दाखल केली आहे. याच पार्श्वभूमीर आज पायलने महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिच्यासोबत केंद्रीयमंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते. पायल घोषने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत वाय दर्जाची सुरक्षा देण्याची देखील मागणी यावेळी केली. त्यांच्यामध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली.
Had a great meeting with honorable @maha_governor Shri @BSKoshyari Sir 🙏🏼. He had supported me and we have to go all the way. The naysayers will be there but I will not stop, not stop and not stop. Bring it on!! pic.twitter.com/76OANU9x5Y
— Payal Ghosh (@iampayalghosh) September 29, 2020
पायल घोष म्हणाली की, त्यांच्यासमोर आम्ही आमचे म्हणणे मांडले. आम्ही त्यांच्याकडे वाय दर्जाची सुरक्षा देण्याची देखील मागणी केले. त्यांनी आम्हाला चांगल्याप्रकारे कॉपरेट केले.
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चित्रपट अभिनेत्री पायल घोष यांचेसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन निवेदन दिले. pic.twitter.com/6zpTVmvth5
— Governor of Maharashtra (@maha_governor) September 29, 2020
रामदास आठवले म्हणाले की, पोलीस तक्रारीनंतर देखील अनुराग कश्यपची अद्याप चौकशी झाली नसून, त्या संदर्भात राज्यपालांना निवेदन देण्यात आले. याआधी काल रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये पायल घोषला सुरक्षा देण्याची देखील मागणी केली होती.
दरम्यान, पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात त्याचार केल्याचे आरोप केले असून, ओशिवरा पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, अनुरागवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.