‘करण जौहरला अडकवल्यास, तुला सोडून देऊन’, निर्मात्याचा एनसीबीवर गंभीर आरोप

एनसीबीने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये मागील आठवड्यात अटक करण्यात आलेल्या निर्माता क्षितीज प्रसादने एजेंसीवर गंभीर आरोप केले आहेत. प्रसादचे वकील सतीश मानशिंद यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, एजेंसीच्या अधिकाऱ्यांनी निर्मात्याला त्रास दिला व ब्लॅकमेल केले.

एनडीटिव्हीच्या वृतानुसार मानशिंदे यांनी सांगितले की, क्षितीज प्रसादला चौकशी दरम्यान करण जौहर आणि त्यांच्या टॉप एग्झिक्यूटिव्हसला अडकवण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. एनसीबीच्या अधिकारी म्हणाले की जर करण जौहर, सोमेल मिश्रा, राखी, अपुर्वा, नीरज आणि राहिल यांचे नाव घेतल्यास सोडून दिले जाईल.

मागील आठवड्यात एनसीबीने प्रसादला अटक केले आहे. त्याच्याद्वारे वकीलांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी मला खोटे आरोप लावण्यास सांगितले की ते (करण जौहर आणि त्यांची टीम) ड्रग्स घेतात. माझ्यावर दबाव टाकल्यानंतर देखील मी त्यांचे ऐकले नाही. कारण, मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही व मला त्यांच्यावर खोटे आरोप लावायचे नाहीत.

यामध्ये अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव घेण्यात आलेले आहे. मानशिंदे म्हणाले की, समीर वानखेडे क्षितीजला म्हणाले की त्यांचे म्हणणे ऐकण्यास नकार देत असल्याने धडा शिकवणार. वानखेडेने क्षितीजला आपल्या खुर्चीजवळ जमिनीवर बसण्यास सांगितले व त्याच्या चेहऱ्यासमोर बूट ठेवून तुझी खरी लायकी ही आहे, असे म्हटले. यावेळी इतर अधिकारी हसत होते. दरम्यान, करण जौहरने क्षितीज प्रसादचा धर्मा प्रोडक्शन्सशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.