मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. कंगना आज मुंबईला येणार आहे. मात्र त्याआधी मुंबई महानगरपालिकेने तिच्या जुहू येथील ऑफिसवर कारवाई करण्यास सुरूवात केली. बीएमसीने ऑफिसवर बुलडोझर चालवले. बीएमसीच्या या कारवाईनंतर कंगनाच्या वकिलांनी आता उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली होती.
Bombay High Court stays BMC's demolition at Kangana Ranaut's property, asks the civic body to file reply on actor's petition pic.twitter.com/VaoeBSOnay
— ANI (@ANI) September 9, 2020
कंगनाच्या याचिकेनंतर न्यायालयाने तिला दिलासा दिला असून, कारवाईला स्थगित करण्यास सांगितले आहे. सोबतच कंगनाच्या याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. उद्या 3 वाजता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
कंगनाने देखील बीएमसीच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या डिमॉलिशनवर बंदी घातलेली आहे. असे असले तरी ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे.
There is no illegal construction in my house, also government has banned any demolitions in Covid till September 30, Bullywood watch now this is what Fascism looks like 🙂#DeathOfDemocracy #KanganaRanaut
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
I am never wrong and my enemies prove again and again this is why my Mumbai is POK now #deathofdemocracy 🙂 pic.twitter.com/bWHyEtz7Qy
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
बीएमसीने कारवाई केल्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली आहे. सोबतच मुंबई पोलीस आणि सरकारवर निशाणा साधत ‘बाबर आणि त्याचे सैन्य’ अशी नाव न घेता टीका केली आहे.
दरम्यान, काल बीएमसीने कंगनाच्या बंगल्याबाहेर एक नोटीस चिटकवली होती. यानुसार कोणतीही परवानगी न घेता कंगनाने अनेक बदल केले होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील अध्ययन सुमनच्या दाव्यावरून कंगनाचा ड्रग्स प्रकरणात तपास करणार असल्याचे म्हटले आहे.