मोदी ‘सरकारी कंपनी विका’ मोहिम चालवत आहेत, राहुल गांधींचा घणाघात


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारी कंपन्यांची हिस्सेदारी विकण्याच्या मुद्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार सरकारी कंपनी विका मोहिम चालवत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

राहुल गांधींनी वृत्तपत्रातील एका बातमीचे कात्रण शेअर केले आहे. यात सरकार एलआयसीमधील 25 टक्के हिस्सेदारी विकणार असल्याचे म्हटले आहे.

यावरून निशाणा साधत राहुल गांधींनी टीका केली की, मोदीजी सरकारी कंपनी विका मोहिम चालवत आहेत. स्वतःमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची भरपाई करण्यासाठी देशाच्या संपतीला थोडेथोडे करून विकले जात आहे. जनतेच्या भविष्य आणि विश्वासाला असे बाजूला ठेवून एलआयसी विकण्याचा मोदी सरकारचा आणखी एक लाजीरवाणा प्रयत्न आहे.

याआधी राहुल गांधी यांनी आज देश मोदी सरकार निर्मिती अनेक आपत्तींचा सामना करत आहे, त्यातीलच एक खाजगीकरण असल्याचे म्हणत टीका केली होती.