रोजगार, उत्पन्न, अर्थव्यवस्था, विकास… सर्वकाही गायब झाले आहे, राहुल गांधींचा घणाघात

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीवरून मोदी सरकारवर टीका करत आहेत. नोटबंदी, दोषपुर्ण जीएसटी आणि अयशस्वी लॉकडाऊन यामुळे अर्थव्यवस्था उध्वस्त झाल्याचे त्यांनी म्हटले होते. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी देशातील विकास गायब झाला असल्याचे म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधींनी ट्विट केले की, 12 कोटी रोजगार गायब, 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था गायब, सर्वसामान्यांचे उत्पन्न गायब, देशातील आनंद आणि सुरक्षा गायब, प्रश्न विचारला तर उत्तर गायब. विकास गायब झाला आहे.

काही दिवसांपुर्वी राहुल गांधींनी ट्विट करत भारत मोदी निर्मिती आपत्तींमध्ये अडकला असल्याचे म्हटले होते. याची त्यांनी उदाहरणे देखील दिली होती. त्यांनी 1. ऐतिहासिक -23.9 आक्रसलेला जीडीपीचा दर, 2.  45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी, 3. 12 कोटी लोकांनी रोजगार गमावला, 4. सरकार राज्यांनी त्यांची जीएसटीची थकबाकी न देणे, 5. जगात दिवसाला सर्वाधिक कोराना रुग्ण आणि मृतांची संख्या, 6. सीमेवर तणावाची स्थिती या गोष्टी मोदी निर्मिती आपत्ता असल्याचे म्हटले होते. राहुल गांधी संकटात अडकलेल्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.