चीनची आगळीक; १९६२ पेक्षाही भयानक अवस्था भारताची करु


नवी दिल्ली – जुन महिन्यात चीन लष्कराने लडाखमधील गलवाण खोऱ्यात केलेल्या नापाक कृत्यानंतर निर्माण झालेला तणाव अद्यापही कायम असतानाच चीनकडून पुन्हा एकदा नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. चिनी लष्कराचा पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. यासंदर्भातील माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. दरम्यान भारताला स्पर्धेत गुंतण्याची इच्छा असेल तर भूतकाळात झाले नाही इतके मोठे लष्करी नुकसान करु अशी धमकी चीनने दिली आहे. चीनने भारताला सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून धमकावले आहे.

सोमवारी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा डाव भारताने उधळल्यानंतर त्याच दिवशी चिनी सैन्यांच्या प्रवक्त्याकडून भारताने बिजिंगमधून सैन्य मागे घेण्याची मागणी करत अनधिकृतपणे नियंत्रण रेषा ओलांडल्याचा आरोप केला. आपल्या सैन्यांनी नियंत्रण रेषा पार केली नसल्याचाही दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

भारताकडूनच सर्वात प्रथम घुसखोरी प्रयत्न केला आणि संघर्षासही सुरुवात केल्याचा दावा चीनने ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये करण्यात आला आहे. शक्तिशाली चीनचा सामना करताना अमिरिकेतून भारताला याप्रकरणी काही पाठिंबा मिळेला, या भ्रमात राहू नका असेही चीनने म्हटले आहे. पण जर संघर्ष करण्याची इच्छा भारताला असेल तर चीनकडे अधिक साधने आणि क्षमता आहे. जर लष्करी सामर्थ्य भारताला दाखवायचे असेल तर पिपल्स लिबरेशन आर्मी भारतीय लष्कराचे १९६२ मध्ये जेवढे झाले नव्हते, त्यापेक्षाही भयानक नुकसान सहन करण्यास भाग पाडेल, अशी धमकी चीनने दिली आहे.