झी मराठीवरील लोकप्रिय ‘रात्रीस खेळ चाले – २’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून शनिवारी २९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित झाला. या मालिकेमुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेली शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर हिने आपल्या इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. मालिका संपल्यामुळे शेवंता खूप भावनिक झाली असून आपल्या इंस्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट करत आणि सेटवरील फोटो अपलोड करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.