भारतातही होऊ शकते ‘या’ ३२७ चिनीवस्तुंची निर्मिती; RIS ने सुचवले चांगले पर्याय


नवी दिल्ली – लडाखमधील गलवाण खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारतात चिनी वस्तुंवर बंदी घालण्याची मागणी जोर पकडत आहे. त्याचा परिणाम भारत-चीन व्यापारामध्ये मोठया प्रमाणावर होत आहे. चीनकडून मोठया प्रमाणावर आपण आयात करतो. पण चीनला त्या तुलनेत निर्यात करत नाही. व्यापारामध्ये आपण मोठया प्रमाणावर अनेक वस्तुंसाठी चीनवर अवलंबून आहोत. आरआयएस या थिंक टँकने अभ्यास करुन चीनवरील हे अवलंबित्व कमी करण्यासाठी काही चांगले पर्याय सुचवले आहेत.

भारत चीनकडून आयात करत असलेल्या वस्तूंमधील तीन चतु्र्थांश किंवा ३२७ वस्तू यांची पर्यायी आयात शक्य आहे. या ३२७ वस्तुंमध्ये मोबाइल फोन्स, टेलिकॉम उपकरणे, कॅमरा, सौर पॅनल, एसी, पेनिसिलन औषधांचा समावेश होतो. तीन चतुर्थांश चीनकडून होत असललेल्या एकूण आयातीमध्ये या ३२७ वस्तुंचा वाटा आहे. आरआयएसनुसार चीन व्यतिरिक्त अन्य देशांकडून या ३२७ वस्तुंची पर्यायी आयात शक्य आहे, तसेच भारतातही याचे उत्पादन केले जाऊ शकते. चीनमधून एकूण ४,०४४ उत्पादने भारतात आयात केली जातात. यात ३,३२६ अशी उत्पादने आहेत, ज्यात फार स्पर्धा नाही. पण ३२७ सेंसिटिव उत्पादने आहेत. एकूण आयातीमध्ये सेंसिटिव उत्पादने फक्त १० टक्के आहेत. ७६ टक्के सेंसिटिव प्रोडक्टमध्ये मशीन किंवा केमिकलचा समावेश होतो.

सरकारने चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मार्च महिन्यापासूनच पर्यायी आयातीचे मार्ग शोधायला सुरुवात केली. पण अन्यत्र चीन सारखीच उत्पादने मिळणार नाहीत याकडे अर्थशास्त्री आणि व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले. चीन अलीकडच्या काही वर्षात इलेक्ट्रॉनिक, रसायने आणि औषध निर्मिती क्षेत्रातील उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनला आहे. चीनमध्ये जगातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी कारखाने सुरु केले. फक्त तेथील बाजारपेठेला काबीज करण्याच्या उद्देशाने हे कारखाने सुरु झालेले नाहीत तर चीनमधून या कंपन्या जगातील अन्य देशांना मालाची निर्यात करतात.