भारतीय क्षेत्रात 1.5 किमी आतमध्ये घुसले आहे चीनी सैन्य, चिदंबरम यांचा दावा

भारत-चीनच्या लडाख येथील एलएसीवरील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानाला पोकळ घोषणाबाजी म्हटले आहे. सोबतच दावा केला आहे की, अद्यापही एलएसीवर भारतीय क्षेत्रात 1.5 किमी आतमध्ये चीनी सैन्य घुसले आहे. काँग्रेस वारंवार भारत-चीन सीमावादावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहे.

माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी ट्विट करत लिहिल की, भारतीय सुरक्षा एजेंसींना अंदाज आहे की चीनी सैनिक अद्यापही 1.5 किमी पर्यंत एलएसीच्या भारतीय क्षेत्रात (भारताच्या धारणेनुसार) आहेत. मे मध्ये चीनी सैनिकांनी एलएसीच्या आपल्या बाजूला 5 किमी आतमध्ये घुसपैठ केली होती.

त्यांनी पुढे म्हटले की, कोणीही भारतीय क्षेत्रात घुसपैठ नाही केली आणि कोणीही भारतीय क्षेत्राच्या आत नाही, या सर्व गोष्टी फक्त बोलण्यापुरत्या आहेत. संरक्षणमंत्र्यांचे हे वक्तव्य की, कोणीही भारतच्या क्षेत्राला 1 इंच देखील स्पर्श करून शकत नाही, ही पोकळ घोषणाबाजी आहे. जोपर्यंत सरकार वास्तव स्वीकारत नाही, तोपर्यंत यथास्थिति दुर्भावनायुक्त लक्ष्य असेल.