नवी दिल्ली – भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी गुगल केली आहे. ही गुंतवणूक पुढील पाच ते सात वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचे पिचाई यांनी स्पष्ट केलं आहे. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पिचाई यांनी चर्चा केली. त्यानंतर ही घोषणा पिचाई यांनी एका ब्लॉग पोस्टमधून केली आहे. यासंदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनेही दिली आहे.
Today at #GoogleForIndia we announced a new $10B digitization fund to help accelerate India’s digital economy. We’re proud to support PM @narendramodi’s vision for Digital India – many thanks to Minister @rsprasad & Minister @DrRPNishank for joining us. https://t.co/H0EUFYSD1q
— Sundar Pichai (@sundarpichai) July 13, 2020
गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत आम्ही आज १० बिलीयन डॉलरच्या (७५ हजार कोटी) गुंतवणूकीची घोषणा केली. आम्ही ही घोषणा भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी करत आहोत. यामध्ये आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला, त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार, अशा आशयाचे ट्विट पिचाई यांनी केले आहे. भागीदारी, ऑप्रेशन्स आणि डिजीटलायझेशनसंदर्भातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित गुगलची ही गुंतवणूक असल्याचेही पिचाई यांनी म्हटले आहे. आज सकाळीच मोदींनी पिचाई यांच्यासोबतच्या बैठकीची माहिती दिली होती.