अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता कलाकार नैराश्याबाबत मोकळेपणाने बोलू लागले आहेत. कलाकार आपल्या नैराश्याबाबत लोकांना सांगत आहे. नुकतेच अभिनेता मनोज बाजपेयीने आपल्या संघर्षाच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या समस्यांविषयी उघडपणे भाष्य केले आहे. बाजपेयीने सांगितले की, संघर्षाच्या काळात आत्महत्येच्या अगदी जवळ होतो. त्यावेळी वडापाव देखील महाग वाटत असे. चाळीतील भाडे देखील कसेबसे देत असे व एका असिस्टेंट डायरेक्टरने त्याचे फोटो देखील फाडले होते.
ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज बाजपेयी म्हणाले की, मी आत्महत्या करण्याच्या खूप जवळ होतो. त्यामुळे माझे मित्र माझ्यासोबत झोपत असे व मला कधीही एकटे सोडत नसे. त्यांनी माझी सोबत तोपर्यंत सोडली नाही, जोपर्यंत मला बॉलिवूडने स्विकारले नाही. त्या वर्षी मी एका चहाच्या टपरीवर होतो. त्यावेळी तिग्मांशू धुलिया आपल्या खटारा स्कूटवरून मला शोधत आला होता. शेखर कपूर यांना मला ‘बेंडिट क्विन’मध्ये कास्ट करायचे होते. मी तर तयार झालो आणि मुंबईला आलो. एकदा एका एडीने माझे फोटो फाडले होते व एका दिवसात मी तीन प्रोजेक्ट गमावले होते.
मनोज बाजपेयीने पुढे सांगितले की, मला माझ्या पहिल्या शॉटनंतर निघून जा, असे देखील सांगण्यात आले होते. माझा चेहरा आइडल हिरो फेस सारखा नव्हता. त्यामुळे त्यांना वाटत होते की मी मोठ्या पडद्यावर कधी येऊ शकणार नाही. त्यावेळी भाडे देण्यास देखील अडचण येत असे. वडापाव देखील महाग वाटत असे. मात्र माझ्या पोटाच्या भुकेने मला यशस्वी होण्यापासून कधी रोखले नाही.