पाकिस्तानने कराची स्टॉक एक्सचेंज हल्लाचे खापर भारतावर फोडले


इस्लामाबाद – कराची स्टॉक एक्सजेंवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून भारतावर खापर फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील अन्य देशांना पाकिस्तानचा हा आरोप मान्य नसल्यामुळेच या हल्ल्यासंबंधी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून अजून कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही. यूएनएससीकडून पत्रक जारी करायला विलंब झाला आहे.

१९ जणांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. तर चार दहशतवाद्यांचा सुद्धा खात्मा झाला असून या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली आहे. अशा दहशतवादी हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेधाचे पत्रक लगेच जारी केले जाते. पण सदस्यांनी मंगळवारी शेवटच्या क्षणी पाकिस्तानच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

कुठलेही पुरावे न देता या हल्ल्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्र मंत्री मकदूम शाह महमूद कुरेशी यांनी भारताला जबाबदार धरले आहे. दरम्यान भारताने पाकिस्तानकडून होणारे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भारतावर आरोप करुन कुरेशी यांनी वातावरण दूषित केल्यामुळे हा विषय सुरक्षा परिषदेने हाताळू नये असे मत UNSC च्या सदस्यांनी व्यक्त केले.

Leave a Comment