आपल्या देशातील स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकायला


मुंबई – पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात १५ जून रोजी रात्री चीन व भारतीय सैन्यामध्ये झटापट झाली. हा संघर्ष शिगेला गेल्याने यादरम्यान २० भारतीय जवान शहीद झाले होते. तर या झटापटीत चीनचेही काही सैनिक मरण पावले होते. पण, या घटनेनंतर सीमेवर तणाव वाढला. त्याचबरोबर चीनविरोधात देशातही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. गलवाण खोऱ्यात चिनी सैन्याने केलेल्या या कृत्यानंतर देशभरातून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे. आता या मागणीवरूनच राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप समर्थकांवर टीका केली आहे.


देशात मागील काही दिवसांपासून चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंबरोबर चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या मालावर बहिष्कार टाकण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या मागणीवर टीका केली आहे. विदेशमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेला चीनकडून ३ कोटीच्या आसपास अनुदान. अजित डोवालांच्या संस्थेचे ९ चिनी संस्थांशी घनिष्ठ संबंध. आणि आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला!, अशा शब्दात भाजप कार्यकर्त्यांवर आव्हाड यांनी टीका केली आहे.

Leave a Comment