भारत-चीन सीमावाद आता राजकारणाचा देखील मुद्दा झाला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या मुद्यावरून वारंवार सरकारवर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी ट्विट करत मोदींवर हल्ला केला आहे.
China killed our soldiers.
China took our land.Then, why is China praising Mr Modi during this conflict? pic.twitter.com/iNV8c1cmal
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 22, 2020
राहुल गांधींनी म्हटले की, चीन आपल्या सैनिकांची हत्या करत आहे. आपल्या जमिनीवर कब्जा करत आहे. मग, चीन मोदींचे कौतुक का करत आहे ? सोबतच त्यांनी वृत्तपत्राचा एक लेख देखील शेअर केला. राहुल गांधींनी शेअर केलेल्या लेखात चीनी मीडिया मोदींच्या भाषणाचे कौतुक करत आहे, अशा आशयाचा मथळा आहे.
पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी की महत्वपूर्ण सलाह। भारत की भलाई के लिए, मैं आशा करता हूँ कि PM उनकी बात को विनम्रता से मानेंगे। pic.twitter.com/0QTewzmcyD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 22, 2020
दरम्यान, याआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देखील पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत त्यांना शब्दांची निवड करताना सावधगिरी बाळगावी, असा सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांनी मनमोहन सिंह यांचे स्टेटमेंट देखील ट्विट करत, आशा आहे की पंतप्रधान त्यांचे (मनमोहन सिंह) म्हणणे विनम्रतेने ऐकतील असे म्हटले.