‘हे बलिदान व्यर्थ जाणार नाही’, सलमानने शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या संघर्षात लडाख येथील गलवाण खोऱ्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. अभिनेता सलमान खानने या 20 शहीद जवानांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

सलमान खानने ट्विट केले की, गलवान खोऱ्यात प्राण गमावलेल्या जवानांसाठी माझे ह्रदय भरून आले आहे. हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांच्या कुटुंबाच्या दुखात मी सहभागी आहे. जय हिंद.

अशा शब्दात सलमानने या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. सलमान खानचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, भारत-चीन सीमावादावरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जूनला सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे.

Leave a Comment