बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांवर बॉलिवूड दिग्दर्शक अभिनव कश्यप याने गंभीर आरोप केले असून माझे करिअर संपवण्याचा सलमानने पूर्ण प्रयत्न केला आणि मला जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचा आरोप त्याने केला आहे. आता त्याचा भाऊ अनुराग कश्यप याने या आरोपांवर प्रतिक्रिया देत या प्रकरणापासून आपल्याला लांब ठेवा, अशी विनंती त्याने नेटकऱ्यांना केली आहे.
For the media calling me and people who want to ask , treat this as my statement. “More than two years ago , Abhinav had told me clearly to stay out of his business and it’s not my place to comment on anything he says or does.“ Thank You
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) June 16, 2020
जी मंडळी मला अभिनवबद्दल विचारत आहेत त्यांना माझ्या या ट्विटद्वारे माझी अधिकृत प्रतिक्रिया समजावी. माझ्या भावाने मला दोन वर्षांपूर्वी त्याच्या समस्यांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. तो जे काही बोलतो, करतो, ते त्याचे वैयक्तिक मत असते, तसेच माझा त्याच्याशी काडीमात्र संबंध नसल्यामुळे कृपया मला सलमान प्रकरणापासून दूर ठेवावे, असे म्हणत अनुरागने प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सोशल मीडियावर अनुरागचे हे ट्विट जोरदार चर्चेत आहे.