वैज्ञानिकांनी भारतातील रुग्ण संख्येबाबत वर्तवलेले भाकित होत आहे खरे


नवी दिल्ली : भारतासह दक्षिण आशियाई देशांसाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सतर्कतेचा इशारा दिला असून या देशातील मोठी लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात अडकू शकते असा दावा त्यांनी केला आहे.

याबाबत मंगळवारी एका मूल्यांकनानुसार दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही सांगितले की, दिल्लीत जुलैअखेर 5 लाखांहून अधिक लोकांना संसर्ग होऊ शकतो. 23 मे रोजी भारतीय वंशाचे वैज्ञानिक भमरार मुखर्जी यांनी दावा केला होता की, देशात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 21 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते आणि दर 13 दिवसांनी ही प्रकरणे दुप्पटीने वाढतील. सध्या भारत कोरोना विषाणूच्या बाबतीत जगात सहावा आणि आशियात प्रथम क्रमांकावर आहे. कोरोना मॉडेलद्वारे मिशिगन विद्यापीठ आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने असा इशारा दिला आहे की, भारतातील 21 लाख लोकांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागण होण्याची शक्यता आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सला मिशिगन युनिव्हर्सिटीचे बायोस्टॅटिस्टिक्स आणि एपिडेमिओलॉजिस्ट प्रोफेसर भमरार मुखर्जी यांनी सांगितले की, भारताची परिस्थिती आणखी गंभीर बनू शकेल. यासाठी त्यांनी आधीच भारतासाठी डिझाइन केलेल्या मॉडेलच्या माध्यमातून चेतावणी दिली होती. एप्रिलमध्ये प्राध्यापक मुखर्जी यांच्या पथकाने प्रथम सांगितले होते की, मेच्या मध्यापर्यंत भारतात संक्रमित लोकांची संख्या 1 लाखांच्या पुढे जाईल.

प्राध्यापक भमरार मुखर्जी म्हणतात की, भारतातील संसर्गाचे प्रमाण अद्याप कमी झाले नाही. सरकारी आकडेवारीनुसार भारतात कोरोनाची लागण होण्याची प्रकरणे दर 13 दिवसांनी दुप्पट होत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाउनशी संबंधित बंधने कमी करणे अडचणी वाढवू शकते. मंगळवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, दिल्ली सरकारचा अंदाज आहे की, राज्यात कोरोना प्रकरणे 12 ते 13 दिवसांत दुप्पट होत आहेत. अशा परिस्थितीत भमरार मुखर्जी यांचे मूल्यांकन खरे होत असल्याचे दिसते. त्यानुसार दिल्लीत 15 जूनपर्यंत 44,000 रुग्णांची नोंद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दिल्लीच्या रुग्णालयात उपचारांसाठी अधिकाधिक बेड्सची आवश्यकता असेल.

Leave a Comment