नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित मजुरांचा प्रश्न चिघळला होता. त्याचबरोबर रेल्वे प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यावरुन आता विरोधकांकडून जेवण आणि पाणी न मिळाल्यामुळे त्या प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. तसेच स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नात सर्वोच्च न्यायालयानेही लक्ष घातले आहे. दरम्यान, रेल्वेसंदर्भात करण्यात आलेल्या सगळ्या आरोपांना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर दिली आहेत. यात त्यांनी एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही, असा केला आहे.
रेल्व मंत्र्यांचा दावा; रेल्वे प्रवासादरम्यान अन्न-पाण्यावाचून एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही
केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन लागू केला. सर्व व्यवहार २१ दिवसांच्या पहिल्या लॉकडाउनमध्ये ठप्प झाल्यामुळे देशभरातील विविध राज्यात काम करत असणाऱ्या मजुरांनी घराकडे स्थलांतर करण्यास सुरूवात केली. त्याच काळात पायीच घरी जाणाऱ्या अनेक मजुरांना रस्त्यातच जीव गमवावा लागल्यामुळे लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होण्यापूर्वी सरकारने विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सुरू केल्या. ८० पेक्षा अधिक जणांचा या गाड्यांमध्ये मृत्यू झाल्याचा दावा राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेसंदर्भात होत असलेल्या आरोपांना उत्तर दिली आहेत.
पूरे देश में किसी भी ट्रेन को 7 या 9 दिन नही लगे, ना ही किसी यात्री की भूख प्यास से मृत्यु हुई है। यात्रियों को 1.19 करोड़ से अधिक भोजन, व 1.5 करोड़ से अधिक पानी की बोतल रेलवे द्वारा दी गयी।
ट्रैक कंजेशन के कारण कुछ ट्रेनों को डाइवर्ट किया गया, जो कुल ट्रेनों का सिर्फ 1.75% हैं। pic.twitter.com/BF5oBJFvyX
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 1, 2020
एक ट्विट करून पीयूष गोयल यांनी यावर भाष्य केले आहे. देशातील कोणत्याही रेल्वेला पोहोचण्यासाठी ७ अथवा ९ दिवस लागलेले नाहीत. त्याचबरोबर जेवण अथवा पाणी न मिळाल्यामुळे एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही. रेल्वे प्रवाशांना १.९ कोटी रूपयांपेक्षा अधिक जेवण व १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल रेल्वेद्वारे पुरवण्यात आले. रेल्वे मार्गातील अडथळ्यांमुळे काही रेल्वेगाड्या वळवण्यात आल्या. ज्याचे प्रमाण एकूण रेल्वेगाड्यांच्या तुलनेत १.७५ टक्के एवढेच असल्याचा दावा गोयल यांनी केला आहे.
स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सध्या चर्चेत आहेत. त्यावरुन राजकीय नेत्यांनी या गाड्यांमध्ये मजुरांना खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याचा आरोप केला होता. तसेच खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दहा दिवसांमध्ये या रेल्वेगाड्यांमध्ये ८० मजुरांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.