ओला पाठोपाठ आता कॅब कंपनी उबरने देखील भारतातील 600 कर्मचाऱ्यांन कामावरून काढून टाकले आहे. उबर इंडियाचे दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रदीप परमेश्वरन म्हणाले की, कोव्हिड-19 च्या संकटामुळे कर्मचाऱ्यांची कपात करण्या व्यतिरिक्त कंपनीकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. चालक, रायडर सपोर्ट व इतर भागातील जवळपास 600 पुर्णवेळ कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे.
त्यांनी सांगितले की, प्रत्येक कर्मचाऱ्याला पुढील 10 आठवड्यांचा पगार दिला जाईल. 6 महिने आरोग्य विमा आणि नोकरी मिळविण्यासाठी मदत केली जाईल.
2 महिन्यात 95 टक्के उत्पन्न कमी झाल्याने मागील आठवड्यात ओलाने देखील 1400 कर्मचाऱ्यांची कपात केली होती. देशभरात कॅब सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात ही कामगार कपात करण्यात झाली आहे.