मुंबई: राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असताना सध्या ट्विटरवर राज्यातील दोन तरुण नेते एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. ट्विटरवर आमदार रोहित पवार आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात चांगलेच शाब्दिक ‘वॉर’ रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर या वादाची ठिणगी पडली.
मी आपणास सांगू इच्छितो की @PawarSpeaks साहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात.
त्यामुळे काळजी नसावी. https://t.co/Fqe9QWKBlQ— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 16, 2020
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशात अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी करणारे पत्र लिहिले आहे. निलेश राणे यांनी शुक्रवारी त्याचा संदर्भ देत एक ट्विट केले. त्यात त्यांनी साखर उद्योगाला आजवर देण्यात आलेल्या आर्थिक मदतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर त्यांनी साखरेच्या प्रश्नावर महाराष्ट्रात आतापर्यंत किती पैसे खर्च झाले ह्याचे ऑडिट व्हायला हवे, अशी मागणी केली.
मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी. https://t.co/nEJDfyblX7
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 16, 2020
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पवार साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असतात. पंतप्रधान मोदीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी, अशा शब्दांत रोहित पवार यांनी निलेश राणे यांना उत्तर दिले होते.
हे रोहित पवार सारखे शेंबडे लुडबुड करत असतात. साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात कुणास ठाऊक?? महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे?? ह्या वांग्याला सांगा ते ठाकरे मुंबईत राहून नाय काय करू शकले हा तर अजून स्वतःची धुवायला शिकतोय.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 16, 2020
पण हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. निलेश राणे रोहित पवार यांच्या या ट्विटनंतर चांगलेच भडकले. निलेश राणे यांनी रोहित यांच्या ट्विटला उत्तर देताना मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही. कुक्कुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? मतदार संघावर लक्ष दे सगळीकडे नाक टाकू नकोस, नाही तर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी, असा पलटवार केला. तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये निलेश यांनी रोहित यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे? असा सवाल करत मुंबईत राहून ठाकरे काही करु शकले नाहीत, असे देखील राणे यांनी म्हटले आहे. आता रोहित पवार निलेश राणेच्या टीकेला काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.