अल्पसंख्यांक आणि मुस्लिमांसाठी भारत जणू स्वर्गच – केंद्रीय मंत्री


नवी दिल्ली : २४ एप्रिलपासून रमजानचा पवित्र महिना सुरु होत आहे. या परिस्थितीमध्ये कोरोनाची एकंदर पार्श्वभूमी पाहता धार्मिक नेतेमंडळी, धार्मिक आणि सामाजिक संस्था या सर्वांनी एकत्र येत मुस्लिम समुदायाला एक आवाहन केले आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी अल्पसंख्यांक आणि मुस्लिम धर्मीयांसाठी भारत जणू स्वर्गच आहे, असे वक्तव्य केले आहे. मुस्लिम समाजाने नमाज पठण, इफ्तार आणि इतर सर्व प्रकारच्या रुढी परंपरांचे घरातच पालन करावे आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन करावे, असे म्हटले आहे.

नक्वी यांनी अल्पसंख्यांक आणि मुस्लिम धर्मियांसाठी जणू स्वर्गच असल्याच्या वक्तव्यावर जोर दिला. भारतात अल्पसंख्यांक आणि मुस्लिमांचे सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक अधिकार सुरक्षित आहेत. जर कोणी काही पूर्वग्रह मनात ठेवून या देशाविषयी चुकीचे वक्तव्य करत असेल, तर त्यांना या देशातील परिस्थिती पाहावी लागेल आणि त्याचा स्वीकारही करावा लागेल, असे नक्वी म्हणाले.

त्यांनी आपले हे ठाम मत Organisation of Islamic Cooperation यांच्या भारतातील इस्लामोफोबियावरील प्रतिक्रियेवर मांडले. ओआयसीकडून रविवारी अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायाच्या हक्कांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलण्यात यावीत आणि देशात सुरु असणारा इस्लामोफोबिया थांबवावा अशी भूमिका मांडण्यात आली होती. नक्वी यांनी त्यांच्या याच आरोपांचे उत्तर देत काही मुद्दे स्पष्ट केले.

Leave a Comment