निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला; भिकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा


मुंबई – विधान परिषदेची निवडणूक पुढे गेल्यामुळे राज्यापालांच्या कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे त्यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती समोर आली होती. आहे. राज्यपालांकडे यासंदर्भात शिफारस देखील करण्यात आली आहे. यावरून आता उद्धव ठाकरे यांना भाजप नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. महाराष्ट्रासाठी भिकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर करा, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.


उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी स्वतःसाठी नशीबवान आहेत. सर्वकाही त्यांना घरबसल्या मिळाले आहे. आता आमदारकीही बसल्या टिकाणी राज्यपालांनी दिली. भिकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा, असे म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद हे मिळाले, आमदारकी राज्यपालांकडून, पक्ष वडिलांचा, त्यांचे स्वत:चे असे काहीच नसल्याची टीका त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

Leave a Comment