बहुमत चाचणीत कमलनाथ सरकार नापास !


भोपाळ: कमलनाथ सरकारला बहुमत चाचणी आज संध्याकाळी ५ वाजता बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार आहे. कमलनाथ यांनी तत्पूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी १५ महिन्यात त्यांच्या सरकारने केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. त्याचबरोबर दुपारी १ वाजता त्यांनी राज्यपाल लालजी टंडन यांची वेळ मागितली असून ते यावेळी राज्यपालांकडे आपला राजीनामा देण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसचे सर्व आमदार राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा देऊ शकतात आणि मध्यावधी निवडणुका घेण्याची मागणी देखील करू शकतात.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी लोकशाही मुल्यांची भाजपकडून हत्या केली गेली. गायींच्या संरक्षणासाठी एक हजार गो-शाळा बनविल्या, राज्यातील माफियागिरी बंद केली. जनतेच्या कल्याणासाठी केलेले काम भाजपला मान्य नव्हते म्हणून त्यांनी नेहमी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला गेला असे आरोप केले. १५ महिन्यात काळात सरकारने केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा यावेळी कमलनाथ यांनी यावेळी मांडला. माझ्या सरकारने १५ महिन्यात शेतकऱ्यांसहित सर्वच क्षेत्रातील नागरिकांसाठी फायद्याचे निर्णय घेतले. जनादेशाचा अपमान करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नसल्याचेही कमलनाथ यांनी सांगितले.

Leave a Comment